Home Loan: प्रत्येक व्यक्तीचे हेच स्वप्न असते की आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, परंतु घर खरेदी करत असताना जवळपास 90% लोकांना गृह कर्जाची गरज भासते, कारण की घरासाठी लागणारे इतके भांडवल प्रत्येकाकडे उपलब्ध असेल असे सुद्धा नसते. त्यामुळे थोडे का होईना कर्ज नागरिक उपलब्ध करून घेतात आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.
अशावेळी कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी नागरिक तब्बल 25 ते 30 वर्षांचा कालावधी घालवतात. परंतु आजच्या लेखांमध्ये दिलेल्या ट्रिकसाठी गृह कर्ज 25 ते 30 वर्षांपर्यंत फिरत बसायची गरज नाही (Home Loan marathi information). फक्त वीस वर्षात तुमच्या संपूर्ण कर्जाची परतफेड तुम्हाला करता येणार आहे. चला याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
छोटी किंवा मोठे का होईना पण आपली हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकांचे स्वप्न असते आणि नागरिक या घरांच्या स्वप्न पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करतात. आपले स्वप्न नक्की कशा प्रकारे पूर्ण करता येईल याचा अभ्यास करतात आणि आपल्याकडे किती भांडवल आहे आणि अजून किती भांडवल लागणार आहे याचे गणित करत असताना उर्वरित जे काही लागणारे भांडवल आहे ते कर्ज स्वरूपाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतात (Home Loan interest rate). कारण की आजकाल जमिनीच्या घरांच्या वाढत जाणाऱ्या जास्तीत जास्त किमतींकडे बघता प्रत्येकाकडेच हवे तितके भांडवल उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे उर्वरित जी काही रक्कम असेल ती नागरिक कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून घेण्याचा विचार करतात.
परंतु कर्जाच्या स्वरूपात जरी रक्कम उपलब्ध करून घेत असाल तर अशावेळी काही महत्त्वाचे अटी काही महत्त्वाचे नियम असतात जे बँकांनी निश्चित केलेले असतात ते आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. ज्या माध्यमातून आपल्याला जे काही उर्वरित कर्ज घेतले आहे त्याची परतफेड करत असताना कोणतीही अडचणी येणार नाही जी काही उर्वरित रक्कम असेल ती व्यवस्थित रित्या परतफेड करता येईल या दृष्टिकोनातून नागरिकांनी अभ्यास करावा आणि घर खरेदीसाठी गृह कर्ज घ्यावे (Home Loan eligibility). आज आपण आजच्या लेखांमध्ये गृह कर्जाबाबत एक विशेष अशी माहिती जाणून घेणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा.
गृहकर्जाचा कालावधी कसा वाढतो? (Home Loan)
बँकेच्या माध्यमातून जो काही व्याजदर असतो तो सातत्याने बदललेला आपल्याला दिसतो. गृह कर्जाच्या परतफेडीचा कालावधी सुद्धा बँकांच्या बदलत्या व्याजदरामुळे वाढू शकतो आणि कित्येक लोक अशावेळी सुरुवातीला याकडे लक्ष देत नाहीत, कारण की दिवसेंदिवस जास्तशी नियम बदलतील (Best home loan India). तसतसे बँकेचे व्याजदर सुद्धा वाढतात. त्याप्रमाणे आपले जे काही हप्ते असतील ते सुद्धा वाढू शकतात आणि नंतर ज्यावेळी ही प्रक्रिया कळते त्यावेळी कर्जाचा कालावधी चांगलाच वाढलेला असतो. तेव्हा नागरिक बँकांकडे तक्रार करतात.
एका उदाहरणामध्ये आपण या गोष्टी समजून घेत असताना, जर तुम्ही वीस वर्षासाठी आठ टक्के दराने तीस लाख रुपयांचे कर्ज घर बांधण्यासाठी घेतले असेल तर अशावेळी तुमच्या जो काही एम आय असेल तो 25 हजार रुपयांचा असेल, म्हणजे 25 हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. बहुतांशपणे बँका फ्लोटिंग रेटवर नागरिकांना गृह कर्ज उपलब्ध करून देतात, म्हणजे रेपो रेट नक्की किती आहे यावर तुमच्या जो काही गृह कर्जाचा दर असेल तो पूर्णपणे अवलंब असतो (Home loan EMI calculator). अशावेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्व बँकांना जो काही दर दिला जातो त्याप्रमाणे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दर म्हणजे जो काही रेपोरेट असतो तो.
गृह कर्ज (Home Loan) ज्यावेळी घेण्यात येथे तिथून पुढे पाच वर्षानंतर, तुमच्या गृह कर्ज हा अचानकच 11% होतो अशावेळी तुमच्या गृह कर्जाची थकीत जी काही मूळ रक्कम असेल ती 26 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे, कारण सुरुवातीच्या वार्षिक कालखंडामध्ये ईएमआय च्या माध्यमातून व्याजाचा जो काही घटक जास्त असतो त्यामध्ये मूळ रक्कम कमी करता येते.
हे पण वाचा: Electricity news: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून मिळणार दिवसा वीज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Also Read
आता पाच वर्षानंतर बघितले तर तुम्हाला असे वाटेल की ईएमआय साठी फक्त पंधरा वर्षे बाकी आहेत, परंतु तसे नसते खरे पाहता, व्याजदर जस्त असा वाढत जातो तसतसा तुमचा जो काही कर्जाचा बोजा असेल तो मुदती सोबत जुळवून घेतला जातो. ग्राहकांना जास्तीत जास्त बोजा सोसावा लागू नये यासाठी या गोष्टी अमलात आणल्या जातात. तसेच बँकांना सुद्धा हे करायचे आहे, कारण तुम्ही जेवढा जास्त काळ एम आय भरत असणार आहे तितके बँकेचे उत्पन्न हे थेट तुमच्याकडूनच होणार आहे.
त्यामुळे जर ईएमआय अगदी पूर्वीप्रमाणेच 25 हजार रुपये च्या आसपास आपण निश्चित केला तर अशावेळी कर्जाचा उर्वरित कालावधी या ठिकाणी पंधरा वर्षाचा नव्हे तर जवळपास 28 वर्षाचा होईल; तसेच या ठिकाणी तुमचा ईएमआय 15 वर्षाप्रमाणे पहिला तर तो जवळपास 29 हजार रुपये पर्यंत वाढू शकतो. अशावेळी वीस वर्षांमध्ये ज्या लोकांना तुम्ही पैसे देणार आहात त्याची व्यवस्थितरित्या परतफेड करण्यासाठी तुम्हाला तीस वर्षाच्या कालावधी लागणार आहे.
अशा बिकट परिस्थितीपासून कसे बाहेर पडावे?
तुम्हाला जर तुमच्या गृह कर्जाच्या कालावधी आणखी वाढवायचा नसेल तर अशावेळी ज्यावेळी व्याजदर वाढणार आहेत त्यावेळी तुम्हाला बँकेसोबत बोलून तुमच्या कर्जाची त्या ठिकाणी पुनर्रचना करावी लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला बँकेला मुदत वाढवण्यासाठी नाही तर अशावेळी नव्या व्याजदराप्रमाणे एम आय वाढवण्यासाठी सांगावे लागेल. बहुतेक पणे बघितले तर ग्राहक सुध्दा हीच चूक करतात आणि बँकांच्या माध्यमातून कर्जाची जी काही पुनर्रचना आहे ती अजिबात करत नाहीत.